
एका साधारण रंगरूपाच्या स्त्री ने केवळ काजळ आणि टिकलीच्या जोरावर सौदर्याच्या परिसीमा गाठाव्यात तशीच कोणतीही भाषा कवितेच्या जोरावर जनमनाचा ठाव घेत असते. एका कवितेचा जन्म, तिच्यामागचा विचार, तिच्यातून मांडलेले प्रश्न आणि मिळालेली उत्तरं... प्रत्यक्ष कवितेपेक्षाही हे मुद्दे कधी कधी जास्त महत्त्वाचे ठरतात.. मी या कार्यक्रमातून माझ्याच काही कवितांमागच्या कहाण्या आपल्यासमोर उलगडणार आहे.